आताच शेअर करा

(गोवा) पणजी:प्रतिनिधि

दिनांक:१६ जानेवारी २०२५

पणजी: गोव्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी ‘ म्हादई नदी ‘ या विषयावर आधारित संपूर्ण गोवा तसेच लंडन येथे गाजलेले व लोकप्रिय ठरलेले ‘ गाँव जाला जाणटो ‘ या नाटकाचे पाच प्रयोग महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात होणार आहे.
      सदर नाटक कलाचेतना वळवई या संस्थेतर्फे सादर करण्यात येत असून गोव्यात गाजलेला म्हादईचा विषय विनोदी पद्धतीने तसेच अत्यंत प्रभावीपणे या नाटकाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. म्हादई नदीचे महत्त्व सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात या नाटकाचे कलाकार पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत.गोव्यातील मडगाव, फोंडा, पणजी, साखळी, सावर्डे याठिकाणी असलेल्या प्रसिद्ध नाट्यगृहात हाऊसफुल्ल प्रयोग झालेले आहेत.

शिवाय लंडनमध्ये या नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळत पाच प्रयोग हाऊसफुल्ल झालेले आहेत.आतापर्यंत या नाटकाचे सुमारे सव्वाशे ( १२५) प्रयोग झालेले असून या नाटकातील कलाकार येत्या २५ जानेवारी रोजी मुंबई येथे दौरा करणार आहेत. २५ जानेवारी रोजी रात्री ८ .१५ वा. साहित्य संघ नाट्यगृह गिरगांव, २६ रोजी सकाळी १०.३० वा. दीनानाथ नाट्यगृह विर्ले पार्ले, दुपारी २.४५ वा. रंगशारदा बांद्रा व रात्री ८.१५ वा. यशवंत नाट्यगृह माटुंगा, २८ रोजी रात्री ८.१५ वा. ठाकरे सभागृह बोरीवली अशा मुंबईतील पाच प्रसिद्ध नाट्यगृहात या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.
    तरुण लेखिका सुचिता नार्वेकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे नाटक अमोघ बुडकुले यांनी दिग्दर्शित केले आहे. गोव्यात लोकप्रियता लाभलेले वासंती फेम नाट्यकलाकार राजदीप नायक हे या नाटकात प्रमुख भूमिका करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *