
बांदा प्रतिनीधी : संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: १ ऑगस्ट २०२४
सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर हे वेगाने विकसित होत असुन अनेक विकासात्मक प्रकल्पामुळे शहरात बाजारीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या काही वर्षात बाजारपेठेत तसेच परिसरात आग लागून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली आहे. महाराष्ट्र गोवा राज्याच्या सीमेवर हे शहर वसलेले आहे. सिंधुदूर्ग जिल्हयातील एतिहासिक व मोठी बाजारपेठ बांदा शहर आहे. बांदा शहरावर ३० ते ४० गावे अवलंबून आहेत. काही गेल्या वर्षात बांदा शहर व दशक्रोशीतील अग्निशमन बंबाच्या कमतरतेमुळे कित्येक एकर जमीन क्षेत्रातील शेती, बागायती जळून खाक झाल्या आहेत. शहरात दुकानांना आग लागून कोट्यवधी रुपयांचे मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी असलेले बंब हे वेळेत उपलब्ध होत नसल्याने दरवर्षी नुकसानीला समोर जावे लागते. यासाठी आपल्या माध्यमातून बांदा शहराला मिनी अग्निशमन बंब उपलब्ध करुन मिळावा. असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस माजी बांदा उपसरपंच व विद्यमान सदस्य जावेद खतीब यांनी रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्ह्याचे खासदार नारायणराव राणे यांना निवेदन सुपूर्त केले आहे.
