आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर

दिनांक: ११ जुलै २०२४
बांदा येथे वसलेल्या व्ही.एन.नाबर प्रशालेत दिनांक ६ जुलै रोजी वनमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

‘ वृक्षवल्ली आंम्हा सोयरे वनचरे ‘ या  सुभाषिताचे विदयार्थ्यांना महत्त्व सांगुन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी या कार्यक्रमाचे उद्‌घाटन तुळशीचे वृक्षरोपण करून केले. नुसती झाडे लावली  म्हणून उपयोग नाही तर ती वाढवलीही पाहिजेत, जगवली ही पाहिजेत. निसर्गा विषयी प्रेम व आदर निर्माण करून वनसंवर्धन केले पाहिजे.विद्यार्थी व सर्व शिक्षकांनी वृक्षारोपण केले व संवर्धन होईल यासाठी लोकांना प्रवृत्त करू असेही ठरविले. प्रशालेच्या सर्व शिक्षकवृंदाने या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे संत तुकारामांच्या उपरोक्त अभंगाच्या ओळींचा प्रत्यय आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *