
सिंधुदूर्ग: संपादकीय
दिनांक :६ जुलै २०२४
जिल्हामार्गावर वाफोली डोंगरीकर हाँटेल जवळील अरुंद रस्ता, तिव्र उतार व धोकादायक वळणावर अपघातचे सत्र सुरु आहे. याच धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून कँन्टरचा रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाला धडकून अपघात झाला. हा अपघात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडला.
सुदैवाने या अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाली नाही, मात्र गाडीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.चालक गोव्याहून बेळगावला जात होता. वळणाचा अंदाज न आल्याने कँटर ‘त्या’ धोकादायक वळणावर अपघात घडला.चालकाला किरकोळ दुखापत झाली. गेल्या तिन महिन्यात ३० हून अधिक अपघात झालेत आहे. यामध्ये मोजक्याच अपघाताची बांदा पोलिसात नोंद आहे.
अरुंद रस्ता, तिव्र उतार व धोकादायक वळणावर पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्ता अरुंद व वळणावळणाचा दिशादर्शक व वेग मर्यादा फलक, संबधित विभागाने रस्त्याचा सर्वे करणे, गतिरोधक, या मार्गावर दोन्ही बाजूस झाडेझुडपे वाढलेली आहे. वळणारवर समोरुन येणारे वाहणे पण दिसत नाही. मुसळधार पाऊसात रस्त्यांच्या दोन्ही बाजूची साफसफाई होणे गरजेचे आहे. सोबत संबधित विभागाने रस्त्याचा सर्वे करणे आवश्यक आहे. या सर्व अपघातांना पुर्णत: बांधकाम विभाग जबाबदार आहे. माणसांचा जीव गेल्यानंतर संबधित विभागाला जाग येणार का? असा सवाल सरपंच प्रकाश दळवी यांनी केला आहे.
