इन्सुली, व्येत्ये, निगुडे आणि सोनुर्ली येथे मोठ्या प्रमाणात काळ्या दगडाचे गौण खनिज उत्खनन उच्च क्षमतेचे बोर ब्लास्टिंग केले जात असून हे बोर ब्लास्टिंग वेळेअवेळी करण्यात येत असून त्यामुळे सदरच्या लगतच्या घराच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत ह्या ब्लास्टिंग मुळे येणारा उग्र वास आम्हा रहिवाशांना, लहान मुलांना, वयोवृद्ध नागरिकांना सहन होत नसून २४ तास चालू असलेल्या ब्लास्टिंग आणि ड्रिलिंग मुळे आजूबाजूच्या परिसरात धुळीचा प्रसार होऊन झाडे काजू ,आंबा यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सुरुंग स्फोटामुळे पाण्याचे अंतर्गत स्त्रोत नष्ट होत असल्याने गावामध्ये पाणीटंचाई भासत आहे. याची वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही आहे.
सन२०१८- १९ मध्ये गौण खनिज उत्खनन व ब्लास्टिंग मुळे घराच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे झाले होते. त्यावेळी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते सदरची नुकसान भरपाई ही तुटपुंजी असल्याने माननीय तहसीलदार सावंतवाडी यांना ही नुकसान भरपाई वाढवून देण्याची विनंती करण्यात आली होती पण अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही.
गौण खनिज उत्खनन व क्रेशर बंद न केल्यास आणि निवेदनात दिलेल्या तारखेप्रमाणे वाढीव नुकसान भरपाई न मिळाल्यास येत्या २६जानेवारीला उपविभागीय अधिकारी ( महसूल ) कार्यालयासमोर उपोषण छेडणार आणि मागण्या पूर्ण न झाल्यास आत्मदहन करणार असा इशारा इन्सुलिन कोठावळे बाण येथील रहिवाशांनी दिला आहे. कुठचाही अनुसूचित किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आणि उपोषणकर्त्यांची जीवित हानी झाल्यास याची संपूर्ण जबाबदार प्रशासनाची राहील.