संपादकीय
दिनांक:१४ नोव्हेंबर २०२४
तुळशीचे लग्न लावण्याची सध्याची पद्धत शिवधर्माच्या दृष्टीने केवळ अमान्यच नव्हे,तर निंद्य देखील आहे.ही भूमिका स्पष्ट होण्यासाठी पुढे दिलेला वास्तव इतिहास समजून घेणे आवश्यक आहे.
9819957223/8369539769
आपल्या समाजाने तुळस ही वनस्पती वृंदा नावाच्या एका महान बहुजन स्त्रीचे प्रतीक म्हणून स्वीकारलेली आहे.तुळस ही मूळची बहुजनांच्या जीवनातील महत्वाची वनस्पती होती.या वनस्पतीचे नाव असलेला 'तुळस' हा शब्द देखील मूळचा बहुजनांच्या देशी भाषेतीलच आहे.ही वनस्पती भारतामध्ये सिंधुसंस्कृतीच्या काळापासूनच अस्तित्वात होती असे दिसते.तुळस ही वनस्पती फक्त भारतातच आढळत,ही वनस्पती अस्सल देशी आहे.एकीकडून तुळस ही वनस्पती तिच्या औषधी गुणांमुळे लोकप्रिय झाली आणि दुसरीकडून कोणत्या ना कोणत्या कारणांने ती पतिव्रता स्त्रीचे प्रतीकही बनून गेली.ती ज्या वृंदेचे प्रतीक बनली,त्या वृंदेने तिच्या गुणांचे माहात्म्य वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे ती वृंदेचे प्रतीक बनली.वृंदेनेच तिची पुजा करण्याची प्रथा सुरू केली.वृंदेची आणि तुळस या वनस्पतीची कोणत्या ना कोणत्या कारणाने कमालीची जवळीक व एकात्मता निर्माण झाली होती. 'तुळशीचे वृदावन' या शब्दप्रयोगातूनही ही जवळीक स्पष्ट होते.वृंदेविषयी कमालीची कृतज्ञता असल्यामुळेच आपल्याकडे अंगणात तुळशीचे वृंदावन बांधण्याची पद्धत आहे.बहुजन समाजामध्ये वृंदा आणि तुळस यांचे ऐक्य मानण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून चालत आली आहे, एवढे निश्चित.
. वृंदा ही प्राचीन भारतामधील एक अतिशय सद्गुणी,चारित्र्यसंपन्न आणि कर्तबगार स्त्री होती.या देशातील बहुजनांच्या मनामध्ये तिच्याविषयी नितांत आदर आहे.ती कालनेमी नावाच्या महान बहुजन सम्राटाची लाडकी मुलगी होती.तो सम्राटही वीर आणि बुद्धीमान होता.वृंदेचे चारित्र्य आणि कर्तृत्व ही एक अस्सल,विशुद्ध आणि तळपणारी निष्कलंक जीवननिष्ठा होती.ती पतिव्रता,सर्वांगसुंदरी,रमनिय प्रियभाषिणी आणि शीलवती होती.जीवनाविषयीचा निर्मळ दृष्टीकोण,सदाचरणी प्रवृत्ती,निष्ठा, संयम,इत्यादी गुणांच्या जोरावर तिने आपल्या निष्कलंक व्यक्तिमत्त्वाचा ठसा समाजजीवनावर उमटवला होता.
जालंधर नावाचा अतिशय पराक्रमी,सद्गुणी आणि शिलवान सम्राट हा तिचा पती होता.त्या दोघांचे दाम्पत्यप्रेम हा स्त्री-पुरुष सबंधांचा एक महान आदर्श होता.त्या दोघांचे परस्परांवर अतिशय उत्कट प्रेम होते.वृंदेची पतिनिष्ठा अनुकरणीय होती आणि जालंधराची तिच्याविषयीची निष्ठाही तशीच आदर्श होती.त्याच्या मनात परस्त्रीचा मोह यत्किंचितही नव्हता.जालंधराला शिवाचा पुत्र मानण्यात आले,यावरून तो शिवाच्या संस्कृतीचा फार मोठा वारसदार होता,हे स्पष्ट होते.तो बळीराजाच्या वंशात जन्माला आलेला होता.आपल्या बळी वगैरे विविध पूर्वजांवर झालेल्या अन्यायाची जाण असल्यामुळे त्याने तसा अन्याय करणाऱ्या शत्रूंना त्याबद्दल जाबही विचारला आणि त्यांचा पाडाव करून आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञताही व्यक्त केली होती.तो महापराक्रमी,धैर्यशील,रणामध्ये अजिंक्य असा योद्धा,युद्धामध्ये गंभीर,संग्रामात सर्वांना जिंकणारा,सर्वप्रकारच्या संपत्तीने विराजित आणि सार्वभौम सम्राट होता.त्याचा राज्यकारभार नितीवर आधारलेला होता.तो प्रजेचे आपल्या औरस संततीप्रमाने पालन करीत असे.तो प्रजेची सर्वतोपरी काळजी घेणारा होता.त्यांच्या राज्यात लोक सुखासमाधानाने राहत होते.कोणी कोणावर अन्याय करीत नव्हते.कोणी कोणाला बाधा पोचवत नव्हते.लोक धनसंपन्न होते.ते सर्वप्रकारच्या धान्यांनी समृद्ध होते.सर्वत्र दुध,दही,तुप होते.सर्वत्र प्रजा संतुष्ट होती.
. जालंधराचे मुळ नाव जलंधर होते.’जलंधर’ म्हणजे जल धारण करणारा वा जलसंधारण करणारा होय.सिंधुसंस्कृतीचे लोक पाण्याचे नियोजन करण्याच्या बाबतीत अतिशय प्रगत होते आणि पाण्याच्या आधारे उत्तम शेती कशी करावी हेही चांगले जाणत होते.बळीराजा हा या संस्कृतीचा एक निर्माता होता आणि महाराष्ट्रात आपण शेतकऱ्याला बळीराजा म्हणतो,हे विख्यातच आहे.स्वाभाविकच वृंदेचा पती जालंधर हा जलनियोजन करण्याच्या बाबतीत अतिशय निष्णात असल्यामुळे त्याला ‘जलंधर’ हे विशेषण प्राप्त झाले आणि त्याचेच थोडे रुपांतर होऊन तो ‘जालंधर’ म्हटला गेला.
आधुनिक काळात ज्यांना वृंदेविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असेल,त्यांनी इच्छा असल्यास वृंदावन उभारण्यास हरकत नाही.कर्मकांडाचे स्तोम न माजवता तुळशीची विशिष्ट पद्धतीने पुजा करणे देखील योग्य आहे.त्या बरोबरच वृंदा आणि जालंधर यांच्या दांपत्यप्रेमातून प्रेरणा घेण्यासाठी दरवर्षी तुळशीचे लग्न लावण्याची इच्छा असल्यास तुळस आणि जालंधर यांच्या विवाहाचे नुतनीकरन साजरे करण्यास हरकत नाही.
जालंधर हा वृंदेचा पती असताना आणि तुळस हे वृंदेचे प्रतीक असताना वृंदेचे लग्न विष्णूच्या कोणत्याही रुपाबरोबर लावणे हे अनैतिक आहे.म्हणून अशा प्रकारचे लग्न कोणत्याही स्वरूपात लावू नये.वृंदा आणि कृष्ण यांचा कसलाही संबंध नसल्यामुळे वृंदा वा तुळस आणि कृष्ण यांचा विवाह लावणे हे त्या दोघांचेही चारित्र्यहनन असून ते अपमानकारक आहे.म्हणून तशाप्रकारचा विवाह कदापी लावू नये.या विवाहाला कृष्ण आणि राधा यांचा विवाह मानणे,हे पूर्णपणे अनैतिहासिक असल्यामुळे तशाप्रकारचा विवाह देखील कोणत्याही परिस्थितीत लावू नये.
सौजन्य – शिवधर्म गाथा
संकलन – रामचंद्र सालेकर
।। जय जिजाऊ ।।
ह्या व अशा निशुल्क माहीती साठी संजीवनी मधुमेह मुक्ती हा ग्रुप जॉईन करा
माहिती आवडली तर आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता इतर ग्रुप वर शेअर करा📲
(कॉपी पेस्ट)
*आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा👇किंवा 9819957223ह्या नंबर वर join me असा
https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah
*शुगर/मधुमेह/डायबेटीज*
नॉर्मल करण्यासाठी वरील 👆फोटो प्रमाणे अनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच *Antox D व Antox T* चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून टेन्शन मुक्त जगा.
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
*Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट* 👇👇👇👇👇
❎ *थकवा अशक्तपणा*
❎ *शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते*
❎ *डोळ्यांना अंधारी येणे*
❎ *किडन्या फेल होने*
❎ *ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे*
❎ *पायाला धग चालू होणे*
❎ *लघवीचा त्रास चालू होणे*
❎ *सेक्स प्रॉब्लेम* 👆 *असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे होतात* जीवनामध्ये हर्बल फार्मूला वापरा
*https://wa.me/9819957223/8369539769*
*Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क – *8369539769/9819957223*