
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
दिनांक २६/१०/२०२४
नेमळे एरंडवाकवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती महेश भिकाजी राऊळ महाराज (४४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणण्यात आले होते त्यातच शनिवारी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.व अनंतात विलीन झाले. मुंबई गोवा महामार्गाच्या झारापपत्रादेवी बायपासलगत नेमळे एरंडवाकवाडी येथे त्यांनी श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना काही वर्षांपूर्वी केली होती. मधल्या काळात ते एका जर्जर अशा आजाराला झुंज देत होते आजारात त्रस्त असूनही त्याची नित्य पुजा पाठ चालु ठेवली होती.त्यांनी आपल्या कारकीर्दीत मठाच्या माध्यमातून बरेचसे स्वामी भक्त गण तयार केलें आपले जीवन स्वामी मार्गात झोकून घेतलें होते शंभर हून अधिक स्वामी भक्तांच्या घरात त्यांनी स्वामीचरण पुजा घडून आणली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोमंतकातील शेकडो भक्तगण या मठात दर्शनासाठी येत होते. नित्य पूजा आरती भजन व इतर आध्यात्मिक कार्यक्रम या मठात संपन्न होत असत. काही दिवसांपूर्वी एका आजाराने ते ग्रस्त झाले होते. त्यांच्यावर कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.त्यांच्यानिधनाबाबत स्वामी समर्थ परिवारातील अनेक भक्तगणांनी शोक व्यक्त केला. नेमळे परिसरातही त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.