ता: ११ जानेवारी २०२४
बांदा टोल नाका स्टॉल धारक संघर्ष समिती व ग्रामस्थ याने कित्येक वर्ष प्रशासनाला आपल्या बागायती जमिनीतून तिलारी धरण प्रकल्पासाठी,राष्ट्रीय महामार्ग आणि टोल नाका यांनाही जागा दिल्या. सरकारने नोकऱ्यांचा आमिष दाखवून आमच्या जमिनी हस्तांतरित केल्या पण आजपर्यंत ह्या प्रकल्पग्रस्तांना एकही नोकरी लागलेली नाही किंवा प्रशासनाने आपल्या मध्ये सामील करून घेतले नाही असे असताना देखील बांदा टोल नाका स्टॉल संघर्ष समिती आणि ग्रामस्थ आपल्या मुलांना नोकरी प्राप्त होईल अशा आशे पोटी प्रशासनाला आमच्या नावे असलेल्या जमिनी वर्ग करून दिल्या गेल्या 35 वर्षत एकही सुशिक्षित बेकार मुलांना दर्जाची नोकरी प्राप्त करून दिली नाही बेरोजगारी मुळे त्रस्त झाल्यामुळे प्रशासनाला दिलेल्या जमिनीचा वापर न होणाऱ्या ठिकाणी आम्ही आमचे स्टॉल आमच्या उदरनिर्वाहासाठी सुरू केले परंतु आम्हाला फक्त एका दिवसाची नोटीस देत आमचे स्टॉल जमीन दोस्त करण्यात आले.
ज्या कायद्याने आणि न्यायाने अतिक्रमानाचा ठप्पा ठेवून आमचे स्टॉल उद्ध्वस्त करण्यात आले त्याच कायद्याचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सिंधुदुर्गातील खारेपाटण पासून बांदा पर्यंतचे अतिक्रमण केलेले सर्वच्या सर्व स्टॉल जमीन दोस्त येत्या आठ दिवसात करण्यात यावे तसे न केल्यास आमचे जमीन दोस्त केले स्टॉल पुन्हा पूर्ववत करून द्यावे. असा इशारा बांदा टोल नाका स्टॉल धारक संघर्ष समिती आणि ग्रामस्थांनी केला आहे असे निवेदन उप अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग क्रमांक ३ सावंतवाडी. यांना देण्यात आले यावेळी टोल नाका धारक संघर्ष समिती अध्यक्ष श्री. आनंद वसकर, उपाध्यक्ष: प्रथमेश गडकरी, सचिव: सागर मोर्यें, सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर, बांदा मराठा समाज संचालक हेमंत दाभोळकर, सदाशिव मोर्यें,विष्णू वसकर, अक्षय परब, रोहित रेडकर, महेश वसकर, कौस्तुभ दळवी, प्रथमेश परब, हर्षद गडकरी, प्रदीप कळंगुटकर लव रेडकर, कोश रेडकर, जयवंत परब, सत्यवान गडकरी समीर धुरी उपस्थित होते