सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय अहिर यांनी बांधकाम विभाग उप अभियंता सावंतवाडी यांच्याकडे मागणी.
ता:११ जानेवारी २०२४
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा हे शहर अतिशय झपाट्याने प्रगतीपथावर जात असून महाराष्ट्र आणि गोवा सीमा लागून अवघ्या तीन मिनिटाच्या अंतरावर वसलेले आहे.सध्या स्थितीमध्ये बांदा कट्टा कॉर्नर येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम चालू आहे. बांदा शहरात आणि लगतच्या असणाऱ्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कालीन अंश आजही सापडत सापडतात आणि बांदा शहरात किल्ल्यांची प्रतिकृती आढळत असून बांदा शहराला ऐतिहासिक वारसा मिळाला आहे. तसेच बांदा शहरामध्ये अजूनही ऐतिहासिक शिवकालीन स्थळे अस्तित्वात आहेत अनेक मंदिरे, मशिदी ह्या पूर्वकालीन इतिहासाची साक्ष देणारे आहेत. त्याशिवाय बांदा शहर सिंधुदुर्गातील सर्वात मोठी बाजारपेठ असून आर्थिक उलाढालीची राजधानी अशी ओळख आहे. तसेच हे शहर महाराष्ट्र आणि गोवा यांचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे या प्रवेशद्वारावर सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची १० ते १५ फुटाची अश्वरूड असलेली पुतळा व्हावा. यासाठी शासन दरबारी तीन कोटी रुपयाची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने तात्काळ आराखडा तयार करून महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात शासनाला सादर करण्यात यावा अशी मागणी बांदा शहरातील सामाजिक कार्यकर्ता संजय अहिर यांनी सावंतवाडी बांधकाम उप अभियंता यांना केली.
All reactions:
22