
सिंधुदूर्ग: संपादकीय
दिनांक: २७ ऑगस्ट २०२४
सिंधुदुर्ग किल्ल्यावर केवळ ९ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा काल सोमवार रोजी अचानक कोसळला. ही बाब खेदजनक असून या बांधकामातील दोषी असणाऱ्यां प्रत्येकावर कठोर कडक कारवाई करावी, असे वक्तव्य रियाज खान यांनी केले आहे.
मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेल्या पुतळ्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्यामुळे तो कोसळला आहे. याला सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकारी तसेच काम करणाऱ्या व्यक्तींची जबाबदारी होती. त्यामुळे या दोषी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कठोर कारवाई करावी.अशी मागणी उबाठा चे सिंधुदूर्ग जिल्हा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष रियाज खान यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यातून मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य बांधणीचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आहे. एवढेच नव्हे तर सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकत्रित करून स्वराज्य उभारणीसाठी अथक प्रयत्न केले. त्यामुळे हे आज हिंदवी स्वराज्य निर्माण झाले आहे. आपल्या स्वराज्यातील एक गवताची काडीही दुसऱ्याकडे घाण ठेवणार नाही एवढ्या मोठ्या मनाचा हिंदवी राजा आणि आज नऊ महिन्यापूर्वी सिंधुदुर्गात राजकोट मालवण येथे उभारलेला पुतळा कोसळावा ही खूप निंदनीय घटना आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी बांधकाम विभाग ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. ह्यामधील असणाऱ्या दोषीवर कोणत्याही प्रकारची क्षमा याचना सरकारने न दाखवता कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच माननीय व्यक्तींच्या हस्ते येथे लोकार्पणहया पुतळ्याचे करण्यात आले होते. समाजात विवध प्रकारचे पडसाद उमटत आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करा अशी मागणी रियाज खान यांनी केली आहे.

