
सिंधुदूर्ग प्रतिनिधि
दिनांक: ७ ऑगस्ट २०२४
मडूरा माऊली मंदिर ते शेर्लेकर वाडी येथे जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर पुल असुन बरेचे वर्षांपूर्वीचे जुनाट बांधकाम असल्या कारणाने धोका दायक परिस्थिती मध्ये आहे. हया पूलाची उंची कमी असल्यास कारणाने दरवर्षी पावसाळ्यात हया पुलावरुन नदीचे पाणी जात आहे. हया वर्षी अतिवृष्टी झाल्याने बऱ्याच वेळा पुलावरून पाणी गेले आहे. आणि हे पूल आज धोकादायक परिस्थिती आहे. हे पूल कधीही वाहून जावू शकतो. त्यामूळे शेर्लेकर वाडीचा गावाशी संपर्क तुटण्याची दाट शक्यता आहे. तसेच गावाला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने शाळेतील मुले व त्या वाडीतील नागरीक पर्यायी मार्ग नसल्याने ह्याच रस्त्याचा वापर करतात. त्यामूळे संबधित विभागाने ह्या कडे लक्ष वेधले पाहिजे. तसेच त्याच पुलावरून महवितरणाची जमनी लागत केबल जात असुन ती सडून गेली आहे. आणि रस्त्यावर आलेली आहे. अशा परिस्थीतीत पाऊस जास्त झाल्याने पुलावरून पाणी जात असल्याने त्या केबलला गुंडाळून पडून वाहून जाऊ शकतो किव्हा शॉक देखील लागू शकतो.अशी परिस्थिती उत्पन्न झाल्यास जबाबदार कोण ?असा प्रश्न पांडूरंग ऊर्फ दाजी सातार्डेकर यांनी स्थानीक वाडीतील ग्रामस्था सहित केला आहे. हया वर लवकर तोडगा प्रशासनाने काढावा अन्यथा पुढे होणाऱ्या अपघाताला प्रशासन जबाबदार राहील असेही म्हणाले.


