आताच शेअर करा

सिंधुदूर्ग : संपादकीय 

दिनांक :८ जुलै  २०२४

शेर्ले – कास हा मुख्य रस्ता काही दिवसापूर्वीच बांधकाम विभागाच्या संबंधित ठेकेदाराने बनवलेला असून काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच्या सर्व नाले मोरीपूल या ठिकाणी खड्ड्यांचे थैमान झाले आहे. आणि काही वाहुन गेले आहेत.नक्की खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही,  की रस्त्यावर खड्ड्यांचे डबके  हा रस्ता पूर्ण खचला असून संबंधित विभागाने केलेले बांधकाम ही वाहून गेले आहे. काही दिवसापूर्वीच कोकण व्हिजन न्यूज चैनल च्या माध्यमातून चित्रफित करून संबंधित विभागाला व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला दाखवण्याचं काम कोकण व्हिजन न्यूज चैनल ने केले होते. परंतु संबंधित विभागाला अजूनही जाग येत नाही. हा विभाग उषा खाली हात घालून झोपला आहे की काय ? असे वक्तव्य कास गावाचे सरपंच प्रवीण पंडित यांनी केले आहे. एवढे सर्व पुरावे देऊनही संबंधित विभाग अजूनही ह्याची दखल घेत नाही. यामुळे कास गावच्या जनतेमध्ये आक्रोश निर्माण होत आहे. सुमारे पावणे तीन कोटी व सात किलोमीटर चा रस्ता ह्या रस्त्याचं बनवलेलं बजेट कुठेही दिसून येत नाही असं जनतेच्या निदर्शनास आले आहे. आणि हे दिसून येत असल्या कारणामुळे जनतेत आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाला लवकरच जाग न आल्यास  ह्या आक्रोशाचे रूपांतर रौद्ररूप धारण करून परिस्थिती वेगळ्या वळणावर जाऊ नये यासाठी  संबंधित विभागाने लवकरात लवकर लक्ष घालावे अन्यथा कास गावची जनता जे काही करेल त्याला सर्वस्वी जिम्मेदार बांधकाम विभाग, विभागातील अधिकारी आणि प्रशासन राहील असेही प्रवीण पंडित म्हणाले तसेच दिवसातून बऱ्याच वेळा एस टी व अवजड वाहने धावत असतात लहान मुलांना शाळेत नेणाऱ्या गाड्या, एस टी मधून जाणारी मुले तसेच अवजड वाहने धावत असताना गाडी खड्यात जावून अपघात झाल्यास जबाबदार कोण ? असाही प्रश्न कास गावच्या जनतेने केला आहे जर लवकरात लवकर हया समस्येवर तोडगा न काढल्यास येत्या १५ ऑगस्टला सर्व ग्रामस्थांन सोबत उपोषणाला बसणार असल्याचा इशार सरपंच  प्रविण पंडित यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *