
दिनांक: २८ /०१/२०२६
संपादकीय: महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. अचानक झालेल्या दादांच्या एक्झिट मुळे राजकीय नेत्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला आश्चर्याचा धक्का बसला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल परिस्थितीमध्ये दिसत आहे. बारामती आणि बीड मध्ये आज बंदचा पुकार देण्यात आला. बीड चे पालक मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा आणि जनतेसाठी राबणारा असा नेता पुन्हा होणे नाही असेही त्यांच्या बाबतीत प्रतिक्रिया येत आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रच्या राजकारणात सर्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अतिशय दुःखत घटना महाराष्ट्रात आज घडली आहे.
