आताच शेअर करा

दिनांक: ३० एप्रिल २०२५

बांदा ग्रामीण प्रतिनिधी: हेमंत मेस्त्री

डोंगरपाल फकिरफाटा कळणे हा रस्ता ग्रा.मा.११९( सा. क्र.०/००ते ४/९००) हे आहे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग ३, प्रस्थापित असून कामाचे सर्वेक्षण दिनांक ३०/१२/२०२३ रोजी करण्यात आले. सविस्तर अंदाज पत्रक तयार करण्यात आले व राज्य तांत्रिक सल्लागार (STA) यांच्या मार्फत दिनांक २२/०२/२०२४ रोजी तपासणी करून मुख्य अभियंता यांच्या मार्फत प्रशासकीय मान्यतेसाठी ग्रामविकास विभाग केंद्र सरकार NRRDA यांच्या कडे सादर करण्यात आले होते सदरची शासकीय मान्यता मिळताच तांत्रिक मंजुरी घेऊन निविदा प्रक्रियेला सुरवात करण्यात आली.संबंधित मक्तेदाराकडून पाहणीही करण्यात आली होती. परंतु ह्या गोष्टीची महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था , सिंधुदूर्ग यांनी लक्ष न दिल्याने २६  जानेवारी २०२४ रोजी उपोषण छेडण्यात आले होते. सरकारने दिलेल्या आश्वासनाला बळी पडून त्याही उपोषणाला स्थगिती देण्यात आली. संबंधित सरकारने ही दिलेली पोकळ आश्वासने हवेत विरगळ्ली.सरकारच्या असल्या आश्वासनावर विश्वास ठेवून सरकारने येथील ग्रामस्थांची फसवणूक केली. त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन आज जनतेच्या समोर हे विषय मांडण्यात आले. पत्रकार परिषदेत असे म्हणाले की हा  गाव डोंगर दऱ्या मध्ये बसलेला असून रात्री अपरात्री येथे हिंस्र प्राण्याची ये जा असते. रस्त्यावर बरेचसे खड्डे पडून त्या रस्त्याची चाळण झाली आहे . कुठल्याही नेतेमंडळीचा येथे लक्ष नाही. लोक प्रतिनिधि आमच्या गावाकडे दुर्लक्ष करून वाळीत टाकल्या सारखे करत आहेत. फक्त मतांचे राजकारण करण्यासाठी ह्या गावात येतात. आज पर्यंत महाराष्ट्र सरकारने आम्हाला ना नोकरी किंव्हा मूलभूत गोष्टींची गावात पूर्तता केली. एस टी महामंडळाची बस देखिल या गावात येत नाही. आज गावातील तरुण वर्ग हा महाराष्ट्राच्या सीमेवरील गोवा हया राज्यात जाऊन पोट भरत आहे. नागरी सुविधांच्या ठिय्या उडवल्या जात आहेत.आम्ही महाराष्ट्रात राहतो की गोव्यात हेच नक्की कळत नाही असे बरेचसे प्रश्न आज ह्या गावातील ग्रामस्थांच्या मनात उद्भवत आहे . एकही नागरिक सुविधा धड महाराष्ट्र सरकारकडून पुरवली जात नाही. त्यामुळे गावातील सर्व नागरिकांकडून मायबाप सरकारला एक विनंती आहे की ह्या मंजूर रस्त्याचे काम निदान पावसा अगोदर पूर्ण करावे न पेक्षा पुढील येणाऱ्या निवडणूकील गावातील ग्रामस्थांकडून मतदानावर बहिष्कार घालण्यात येईल असा निर्णय हया पत्रकार परिषदेत घेण्यात आला.  यावेळी.गुणाजी गवस, बाबूराव परब, नामदेव गवस, मुकुंद गवस, कुमार गवस, अमित गवस, एकनाथ गवस, निवृत्ती गवस, राजन गवस, सचिन गवस, राजू गवस, महादेव गवस. इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *