दिनांक: ८ एप्रिल २०२५
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
एन काजू हंगामात आग लागून वाफोली येथे अनेक काजू बागांचे लाखोचे नुकसान झाले सविस्तर वृत्त असे की कालव्याच्या नजीक असलेल्या काजू बागायतीमध्ये
अचानक शॉर्ट सर्किट मुळे दुपारी बाराच्या सुमारास भीषण आग लागली आहे.या आगीच्या भडक्यामध्ये काजू बागायतीचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आहे. काजूच्या हंगामात ही आग लागल्याने बऱ्याच नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला.
त्यामध्ये सुनिता सुधाकर गवस, उमाजी खेमा गवस,भाग्यश्री भगवान सावंत, नलिनी यशवंत गवस,सुरेश गवस, यांच्या काजू बागायतीचे बरेच नुकसान झाले आहे.आगीच्या घटनेची माहिती मिळताच गावातील स्थानिक ग्रामस्थांनी तसेच काजू बागायतदारांनी घटनास्थळी धाव घेतली.अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.तरी संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी.अशी मागणी काजू बागायतदारांकडून करण्यात येत आहे.
