
संपादकीय: सिंधुदुर्ग
२५ मे २०२४
मान्सून पूर्व पावसामुळे आणि झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मडूरा पंचक्रोशीतील तसेच मडूरा शेरलेकरवाडी आणि केरकरवाडी येथे विजेचे खांब तुटून पडले आहेत.भर रस्त्यात हे खांब तुटून पडल्या कारणामुळे मडुरा मंदिर ते शर्लेकर वाडी या दरम्याने जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर विजेच्या तारा खाली आले आहेत. त्यामुळे रस्त्याने जाणे येणे कठीण झाले आहे. वाहतुकीस हा रस्ता बंद पडल्याने कोणताही अपघात होऊ शकतो. पावसाच्या तडाख्यानंतर जनजीवन सुरळीत झाले असून गेले पाच दिवस महावितरणाची काम करण्याची पद्धत अजून सुरळीतपणे चालत नाही. याला जबाबदार कोण ?असा सवाल कृष्णा केरकर सह दोन्ही वाडीतील ग्रामस्थांनी केला आहे. महावितरणाच्या गलत कारभारामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे. तसेच उप अभियंता आणि कर्मचारी यांचा फक्त महावितरणाचा पगार घेण्यासाठीच संबंध येतो की काय? असा प्रश्नही उपस्थित केला या कामाच्या संदर्भात उप अभियंता यादव आणि तेथील महावितरणाचे कर्मचारी फक्त हातावर हात धरून पूर्ण वर्ष बसून असतात पावसाळा आला की यांना फक्त कामाची जाग येते. तो पर्यंत मान्सून पूर्व पाऊस येऊन यांची झोप उडवत असतो. विजेच्या तारांवरील आलेली झाडे झुडपे याची छाटणी कधीच होत नसून येथील महावितरणचे कामगार आणि अधिकारी फक्त महावितरणाचा बसून पगार घेत असतात. ज्या गावासाठी वायरमेन नेमून दिलेला आहे. त्या गावात त्यांनी राहणे बंधनकारक आहे. पण तो त्या गावात न राहता शहराच्या ठिकाणी राहत आहे. त्यामूळे रात्री अपरात्री लाईट गेल्याने नागरिकांना अंधारात पूर्ण रात्र काढावी लागत आहे.नागरिक सुविधा घेण्यासाठी वायरमेनला शहराकडे राहणे गरजेचे वाटते. पण रात्रभर अंधारात तळमळत असलेल्या नागरिकांना सुविधा देणे गरजेचे वाटत नाही असा ही प्रश्न ग्रामस्थांकडून ऐरणीवर येत आहे. अजून किती दिवस विजे पासून वंचित राहावं याचा उलगडा लवकरात लवकर न झाल्यास ग्रामस्थांच्या रोशाला महावितरणाला व अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागेल. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिक सुविधा पुरवणे हा ग्रामपंचायतीचा अधिकार असून महावितरणाच्या भेसळ कारभारात सरपंच आणि सदस्य यांनी हस्तक्षेप करून हा महावितरणाचा दोघांनी मिळुन तिढा सोडवून ग्रामस्थांना विजेची सुविधा प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे असे श्री. केरकर म्हणाले



