
बांदा प्रतिनिधी : संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: २० मे २०२४
बांदा शहरात सातत्याने परप्रांतीयांचा वाढलेला उपद्रव, व त्या पातळीवर वाढणाऱ्या उपद्रवा बाबत शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक परब यांनी येथील पोलिस ठाण्यात या बाबत लक्ष देऊन अश्या प्रकारे येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद आपल्या दप्तरी ठेवण्यात यावी या बाबतच्या सूचना केल्या.
या वेळी त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भाई जाधव व पत्रकार रामदास जाधव उपस्थित होते.
गेले काही दिवस बांदा शहरात परप्रांतीयांचा उपद्रव वाढला आहे. त्यामूळे बांदा शहरातील नागरीक त्रस्त आहेत. याचे कारण परप्रांतीयां कडून गुन्हे घडताना निदर्शनास येत आहेत. बऱ्याच प्रमाणात याचा त्रास महिला वर्गाला सहन करावा लागत आहे. महिलांचे, तरुण मुलींचे मोबाईल नंबर घेऊन त्यावर अश्लील मेसेजेस पाठवणे, त्यांना फोन करणे, आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, या सह, चोऱ्यामाऱ्या, मारामाऱ्या, आत्महत्या या सारखे गुन्हे घडत आहेत.
मुळात बांदा हे शहर शांततेचे प्रतीक आहे. या भागात जी गावे आहेत, ती बरीचशी गावे ग्रामीण भागातील आहे. बांदा शहर हे मुख्य ठिकाण असल्याने येथे ग्रामीण भागातील गावांमधील जनता बांदयातील बाजारपेठेत खरेदी विक्रीसाठी येत असतात परंतु या शहराला अजुन तरी शहरिकरणाने तसा स्पर्श केला नाही. मात्र येत्या काही वर्षात शहरी गुन्हेगारी येऊ शकते. या साठी उपाय योजना म्हणून आपण या कडे बघताना. या भागात येणाऱ्या परप्रांतीयांची कसून चौकशीसह त्यांची पूर्ण माहिती. घ्यावी. असे ज्येष्ठ शिवसैनिक परब म्हणाले जे घर मालक अशा भाडोत्रीना भाड्याने घर देतात त्यांनाही सूचना करून त्यांच्याशी संपर्क करून माहिती घ्यावी. आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावातील पोलिस पाटलाला. अश्या प्रकारे माहिती घेण्याच्या सूचना कराव्यात.जेणेकरून वाढणाऱ्या गुन्हेगारीवर आपल्याला ताबा ठेवता येईल. किंव्हा गुन्हेगार पर्यंत पोहोचता येईल. सध्यातरी महिला वर्ग भीतीच्या छायेखाली वावरत आहे. याचेही आपण निरीक्षण करावे. थोड्याच दिवसात. शाळा महाविद्यालये सुरू होणार, वर्दळ वाढणार. या कडेही लक्ष असावे. अश्या प्रकारच्या सूचना या वेळी बांदा पोलिसांना परब यांनी केल्या.
या सर्व सुचानावर बोलताना बांदा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवाजी झाजूर्णे यानी सूचना ऐकून आपले पोलिस या बाबत योग्य ती कारवाई करतील. पण भाडोत्री बाबत घर मालका कडून माहिती येत नाही. पण ज्या वेळी अश्या प्रकारच्या घटना घडतात त्या वेळी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे उपनिरीक्षक शिवाजी झांजुर्णे म्हणाले.
