
बांदा प्रतिनिधि / अक्षय मयेकर
दिनांक:९ नोव्हेंबर २०२४
ड्यूश बँकेने आपल्या बँकेच्या मुंबई मुख्यालयात उद्योगपती रतन टाटा यांच्या स्मरणार्थ त्यांच्या शिल्पचित्राचे नुकतेच अनावरण केले. टाटा उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष नोएल टाटा आणि ड्यूश बँकेचे जागतिक अध्यक्ष जेम्स वॉन मोल्टके यांच्या हस्ते या शिल्पचित्राचे अनावरण करण्यात आले. सदर शिल्पचित्र मडूरा (ता. सावंतवाडी) येथील नितेश प्रफुल्ल परीट या युवा कलाकाराने बनविले आहे. देशातील सर्वात मोठ्या टाटा उद्योग समूहाने नितेशच्या शिल्पकलेचा केलेला हा सर्वोच्च बहुमान असल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईवडिलांनी दिली. नितेशच्या या सन्मानाबद्दल त्याचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.
ड्यूश बँकेचे सध्याचे मुख्यालय हे एकेकाळी टाटा कुटुंबीयांचे खाजगी निवासस्थान होते. उद्योगपती रतन टाटा आणि त्यांच्या भावंडांसह टाटा ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष नोएल टाटा यांचे बालपण याच इमारतीत गेले. टाटा कुटुंबाने सन १९९२ मध्ये टाटा हाऊस म्हणून ओळखले जाणारे निवासस्थान ड्यूश बँकेला विकले. या इमारतीत रतन टाटा यांच्या स्मरणार्थ त्यांचे शिल्पचित्र लावण्याचा निर्णय ड्यूश बँकेने घेतला होता. यासाठी टाटा उद्योग समूहाने नितेश परीट याने बनविलेल्या शिल्पचित्राची निवड केली.
रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्याच दिवशी त्यांना श्रद्धांजली म्हणून नितेशने त्यांचे छोटे शिल्पचित्र बनविले. सदर शिल्पचित्र सोशल मीडियावरून व्हायरल झाले. याची दखल खुद्द नोएल टाटा यांनी घेतली आणि नितेशला मुख्य कार्यालयात बोलावून त्यांनी रतन टाटा यांचे मोठे शिल्प बनविण्याची जबाबदारी दिली. नीतेशने बनविलेले शिल्पचित्र टाटा कुटुंबीयांना खूपच भावले. त्यांनी ते चित्र कुटुंबाच्या आठवणी ज्या इमारतीत आहेत त्या जागेत लावण्याचे ठरविले. ड्यूश बँकेनेही रतन टाटा यांच्या सन्मानार्थ सदर शिल्पचित्र मुख्य कार्यालयात लावण्याचा निर्णय घेतला.
शिल्पचित्र अनावरण सोहळ्याला ड्यूश बँकेचे जागतिक अध्यक्ष जेम्स वॉन मोल्टके यांच्यासह बँकेचे संचालक, वरिष्ठ पदाधिकारी, टाटा समूहाचे अध्यक्ष नोएल टाटा व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नितेशने यापूर्वी माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, उस्मानाबादचे पहिले आयपीएस अधिकारी शिवाजी सोनावणे तसेच प्रसिद्ध कीर्तनकार पार्वतीबाई सातकर यांची शिल्पचित्र बनविली आहेत.
पुढे नितेश म्हणले की उद्योगपती रतन टाटा यांच्याबद्दल आधीपासूनच प्रचंड आदर होता. टाटा उद्योग समूहाने शिल्पचित्र बनविण्यास सांगितल्याने माझ्यासाठी ते मोठे आव्हान होते. आईवडील, काका यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पचित्र तयार केले. टाटा समूहाने माझ्या कलेचा केलेला हा माझा मोठा सन्मान आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया नितेश परीट यांनी दिली.



*हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या होणारे नुकसान…..!*
थंडीला आता पाहिजे तशी सुरूवात झालेली नाही. मात्र, थंडीला सुरूवात होताच जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. कारण या दिवसात थंड पाण्यात कुणी हात घालायला देखील धजत नाहीत. लोक थंडी घालवण्यासाठी आणि शरीराला चांगलं वाटतं म्हणून बराच वेळ गरम पाण्याने आंघोळ करत बसतात. पण जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं की, जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं शरीरासाठी नुकसानकारक ठरतं.
*काय काय नुकसान होतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…*
*त्वचेचं नुकसान…*
गरम पाणी शरीरावर असलेल्या मॉइश्चरायजरला दूर करतं. पण जास्त वेळ गरम पाणी अंगावर घेतलं तर स्किनवरील नॅच्युरल मॉइश्चर कमी होऊन स्किनचं नुकसान होतं. जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्किन ड्राय होते आणि स्किनवर क्रॅक्स येऊ लागतात. हे भलेही दिसत नसतील पण याने रॅशेज आणि इचिंगची समस्या निर्माण होऊ शकते.
*इन्फेक्शनचा धोका…*
हिवाळ्यात साधारणपणे त्वचा उलण्याची समस्या अधिक होते. त्यामुळे वातावरणातील बॅक्टेरिया सहजपणे त्वचेमध्ये प्रवेश करतात. याने इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो.
*प्रजनन क्षमतेवर प्रभाव…*
रिसर्चनुसार जर व्यक्ती ३० मिनटांपेक्षा अधिक वेळ गरम पाण्यात राहत असेल तर त्याच्या प्रजनन क्षमतेवर याचा प्रभाव पडतो. जास्त गरम पाण्यामुळे शुक्राणू कमजोर होतात किंवा त्यांच्या निर्मितीवर परिणाम होतो.
*सुरकुत्या येतात…*
गरम पाण्याने भलेही तुम्ही चेहरा धुवत नसाल, पण पाण्याची वाफ चेहऱ्यावर येतेच. यामुळे स्किनचे पोर्स मोठे होतात. सोबतच स्किनचं मॉइश्चर डॅमेज होऊन सुरकुत्या येऊ शकतात.
*केसगळती…*
गरम पाण्याने केस आणि डोक्याची स्किन ड्राय होते. यामुळे केस सहज तुटू लागतात. याने केसगळी वाढून डोक्यात खासही येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला टक्कल पडणं टाळायचं असेल तर जास्त गरम पाण्याने केस धुवू नका किंवा आंघोळ करू नका.
*गरम पाण्याने किती वेळ आंघोळ करावी…?*
एका रिसर्चनुसार, गरम पाण्याने १० ते २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ आंघोळ करू नये. तसेच आंघोळीनंतर शरीरावर मॉइश्चर लावणं गरजेचं ठरतं. जेणेकरून स्कीन ड्राय होऊ नये आणि इतरही काही समस्या होऊ नये.
*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*
*आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा👇किंवा 9819957223/8369539769ह्या नंबर वर join me असा मेसेज करा*
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*