आताच शेअर करा

मांद्रे पंचायत जवळ भीषण अपघात होऊन आसकावडा मांद्रे  येथील सानिका सुभाष खरबे  १९ वर्षे व प्रियांका संदेश खरबे २९ वर्षे या दोघीजणी जागीच ठार झाल्या. तर तिसरी युवती गंभीरित्या जखमी झाली आहे.
सविस्तर माहिती अशी की सानिका सुभाष खरबे, प्रियांका संदेश खरबे आणि सिद्दी शेटकर एक युवती तिघेजणी आपली स्कूटर जी ए ११सी,२०२९ ही घेऊन मांद्रे मासळी मार्केटकडे मासे आणायला गेली असता, मासळी मार्केटच्या दोनशे मीटर अगोदर रिक्षा मांद्रे भागातून हरमल दिशेला जात होती. तर त्याच्या विरुद्ध ट्रक के ए २२ डी ४८२२ हा मांद्रे मार्गे आगरवाडा शिवोली ला जात होता.दुचाकी स्वरांनी रीक्षेला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाच्या मागच्या बाजूने दुचाकीची धडक लागली आणि दुचाकी सहित तिन्ही युवती खाली कोसळल्या, त्यात सानिका सुभाष खरबे आणि प्रियांका संदेश खरबे या दोघीजणी जागीच ठार झाल्या तर दुचाकी चालवणाऱ्या युवती गंभीरित्या जखमी झालेल्या आहेत. त्यांना बांबोळी येथे उपचारासाठी पाठवण्यात आल्या. अपघात झाल्यानंतर ट्रक तसाच आगरवाडा पर्यंत निघून गेल्यानंतर काही जमावाने तो ट्रक अडवला. एकाच अपघातात एकाच घरातील दोघेजणी जागीच ठार झाल्यामुळे आसकावडा परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले.
सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केल्यामुळे निदान आज तरी मासे खायला मिळतील या उद्देशाने प्रियांका संदेश खरबे व सानिका सुभाष खरबे आणि एक युवती मिळून तिघेजण आपली वाहन दुचाकी घेऊन मासळी मार्केटकडे निघाली असता वाटेतच हा अपघात झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे सानिका सुभाष खरबे ही आयटीआय करत होती,तर गंभीर जखमी झालेली सिद्धी शेटकर ही उच्च माध्यमिक शिक्षण घेत होती.
प्रियांका संदेश खरबे ही हाऊस वाइफ गृहिणी म्हणून कार्यरत होती. त्यांना दोन मुलं, प्रियांका संदेश खरबे याची नणंद सानिका सुभाष खरबे होती. तर गंभीर रित्या जखमी झालेली सिद्धी शेटकर ही प्रियांका संदेश खरबे  यांची सख्खी बहीण.
अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालक आणि रिक्षा चालकाला मांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मांद्रे पंचायत क्षेत्रातील अनेक रस्ते धोकादायक आणि खड्डेमय बनत असल्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झालेले आहे. आजचा अपघात हा गंभीर अपघात असून एकाच कुटुंबातील अशा व्यक्ती जाण्याची ही पहीलीच  घटना आहे.
अपघात झाल्यानंतर मांद्रे पोलीस निरीक्षक शरीफ जॅकीश यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. आणि तातडीने रिक्षा चालक आणि ट्रक चालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अधिक चौकशी तपास करण्याचे काम पोलीस निरीक्षक शरीफ करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हा अपघात का घडला? प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी कुणीच बघितलं नसल्यामुळे अपघाताचे नेमकं कारण समजू शकले नाही. त्यामुळे पोलीस वेगळ्या माध्यमातुन चौकशी करत आहेत.या परिसरात सी सी टीव्ही कॅमेरे नसल्यामुळे अपघाताचे कारण स्पष्ट होऊ शकत नाही. परंतु दुचाकी ही सुसाट वेगाने जात होती आणि रिक्षा च्या मागे टक्कर झाली असल्याचा काहींचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *