
सिंधुदूर्ग: संपादकीय
दिनांक:१७ ऑगस्ट २०२४
बांदा येथे महामार्गावरील फ्लायओव्हर ब्रिजचे काम चालू आहे. हे काम सावंतवाडीतील त्रिमूर्ती कन्ट्रक्शन कंपनी करत आहे. या कंपनीचे यार्ड ओमकार नगर मुंबई गोवा हायवे डीगणे येथे आहे. या कामासाठी लागणारे सिमेंट, सळई, लोखंड आणि अजून काही वस्तू ही तेथे स्टॉक करून ठेवण्यात येतात. या साईटवर सकाळच्या वेळेत ८ :०० ते संध्याकाळी ६:०० यादरम्याने सुपरवायझर असतो. सकाळी काम करण्यासाठी कामगार वर्ग बऱ्याच प्रमाणात येत असतो. परंतु रात्रीच्या वेळात हे याड पूर्णपणे बंद असते. दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ४: ४५ वा. च्या दरम्यान एक सफेद रंगाची नंबर प्लेट नसलेली गाडी आली. आणि १०mm व १२ mm च्या सळ्या सुमारे ३०,००० रुपये किमतीचे सामान घेऊन पसार झाले आहेत.
ही चोरी तीन इसमाने मिळून केलेली आहे असे त्रिमूर्ती कंट्रक्शन यार्ड मध्ये लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये निदर्शनास दिसून येत आहे.तसेच या हायवे लगत कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे प्रशासनाच्या माध्यमातून बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे बांदा येथे चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्याच दिवशी सकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास जवळ असलेल्या बैठक कॅफेचा सीसीटीव्ही कॅमेरा अज्ञात इसमानी काढला आहे.सकाळच्या वेळेत येणारे दुधाच्या कॅरेट मधील दूध घेऊन अज्ञात इसम पसार झाले आहेत. अशा बऱ्याचशा घडामोडी येत्या आठ ते दहा दिवसात बांदा येथे घडलेले आहेत.
चोरी, डकेती, अपहरण, धमकी आणि घातपात करण्याचा प्रयत्न असे अनेक प्रकार घडताना बांदा शहरात निदर्शनास येत आहेत. बांदा शहरा लगत कोणतेही प्रशासनाचे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.आणि असलेले कॅमेरेही बंद पडले आहेत. त्यामुळे गुन्हेगार सराईत गुन्हा करून पसार होत आहे. काही दिवसांवरच कोकणातील गणेश चतुर्थी सारखा मोठा उत्सव येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहेत तसेच बांदा शहरात ३० ते ४० गावांचा संपर्क येत असून मोठी बाजारपेठ असल्याने येथे बरेच लोक खरेदीसाठी येतं असतात. चतुर्थीच्या सणामध्ये चाकरमांन्या
मुळे ही गर्दी दुप्पट वाढत असते. बांदा शहरामध्ये बांगलादेशी व अन्य अशा काही लोकांचा सुळसुळाट दिसून येत आहे. त्यामुळे चोरीची प्रकरणे अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांदा पोलिसांनी याकडे लक्ष देऊन आपली गस्त वाढवावी असे त्रिमूर्ती कन्ट्रक्शनचे मालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सावंतवाडी विधान सभा युवक अध्यक्ष विवेक गवस यांनी म्हणाले आहे.
