
सिंधुदूर्ग: संपादकीय
दिनांक: २९ जून २०२४
सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव म्हापसेकर टेंब येथील सुनंदा काशीराम सावंत यांच्या घराजवळून नवीन विद्युत लाईन टाकण्यासाठी पोल पुरण्याचे काम सुरू होते. सुनंदा सावंत या सावंतवाडीला आपल्या मुलाकडे राहत असल्याने त्यांचे घर बंद अवस्थेत आहे. विजेची लाईन ही रस्त्याच्या कडेने टाकायची असते. किंव्हा ज्यांच्या जमिनीतून जात असते त्यांची तशी रीतसर परवानगी घ्यावी लागते.तशी त्यांनी परवानगी न घेता. वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कोणाच्या परवानगीने विद्युत लाईन ही लोकांच्या वैयक्तिक जमिनीतून टाकायला सुरुवात केली ?हा एक प्रश्न आहे. आजूबाजूंच्या लोकांचा विरोध असताना सुद्धा वीज मंडळाच्या कामगारांनी वैयक्तिक जमिनीतून विद्युत लाईन टाकली. त्यात अजब गोष्ट अशी की सुनंदा सावंत यांचे घर बंद असल्याचा फायदा घेऊन घरासमोर अठरा वर्षांपूर्वी कुंपणाचा मारलेला सिमेंटचा पोल मुळात घातलेले सिमेंट सकट काढून टाकला आणि त्या ठिकाणी विजेचा पोल उभा केला गेला. काही दिवसानंतर जमीन मालकाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सुनंदा सावंत यांच्या मुलाने लेखी अर्ज सहाय्यक अभियंता श्री खोब्रागडे वीज मंडळ कार्यालय सावंतवाडी यांच्याकडे केला. त्यावेळी तो वीज पोल काढून त्या ठिकाणी पुन्हा सिमेंट पोल लावून दिला जाईल असे आश्वासन दिले गेले. परंतु त्यानंतर काही दिवसांनी त्यांना परत विचारणा केली असता खोब्रागडे हे उडवा उडवीची उत्तरे आणि अरेरावीची भाषा वापरत आहेत तसेच कॉल केला असता परत यासंबंधी कॉल करायचा नाही असे धमकावत आहेत. तरी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून हा पोल काढून ही विद्युत लाईन रस्त्या लगत टाकुन कोणाच्या वैयक्तिक कंपाउंड मध्ये येणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सर्व स्तरातून चर्चा होत आहे.

