आताच शेअर करा

दिनांक: १७ मार्च २०२५

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर

बांदा सटमटवाडी डिंगणे  डांबरीकरण करण्यासाठी गेली २० दिवस खोदाई करून ठेवण्यात आला आहे. जवळ जवळ हे काम पूर्णपणे बंद असून ग्रामस्थांना व शाळेतील मुलांना ये जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी पूर्णतः जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होईल असे या संत गतीने चालणाऱ्या कामामुळे वाटत नाही त्यामुळे हे काम लवकर पूर्ण न झाल्यास सटमटवाडी ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. हा रस्ता लवकर करण्यासाठी ग्रामस्थ कॉन्ट्रॅक्टर आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक झाली होती. त्यानंतर या मीटिंगमध्ये कॉन्ट्रॅक्टर यांनी आश्वासन देऊन लगेच काम करण्याची ग्वाही दिली होती. आणि या नंतर काम पूर्ण होई पर्यंत बंद ठेवणार नाही असे आश्वासनही देण्यात आले होते. बांदा सटमटवाडी डिंगणे डांबरीकरण रस्ता २३ वर्षांपूर्वी नाबाड अंतर्गत डांबरीकरण करण्यात आले होते. कोरोनाच्या काळात हया रस्त्याने गोवाराज्यत जाण्यासाठी वाहतूक मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्या दरम्याने पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे गाळले डिंगणे डोंगर कोसळल्याने वेंगुर्ल्यातील एका इसमाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी सिंधुदुर्ग आपत्ती व्यवस्थापन या अंतर्गत जोरदारपणे युद्ध पातळीवर पोकलेन जेसीपी डंपर लावून काम करण्यात आले होते. त्यामुळे सटमटवाडी रस्त्याची चाळण होऊन रस्ता खड्डेमय व धोकादायक परिस्थितीत झालेला होता.त्यानंतर  नविन रस्त्याची मागणी करण्यात आली होती. तेव्हा पासून आज पर्यंत त्या रस्त्यावरून ग्रामस्थ आणि शाळेतील मुले पर्यायीरस्ता  नसल्याने ह्याच रस्त्याचा वापर करत आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता मंजूर होऊन गेली तीन ते चार वर्षे पूर्ण झाली. सदरचे काम सततच्या मागणीमुळे फेब्रुवारी महिन्यात चालू करण्यात आले. काही दिवस काम व्यवस्थित रित्या चालू होते पण गेली २० दिवस हा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायत सदस्य अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांना संपर्क केला असता लवकरात लवकर काम सुरू करू असे सांगण्यात आले आहे. ह्या रस्त्याचा पाठपुरावा करून सदर रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी श्री आनंद वसकर, प्रदीप कळंगुटकर,  संजय केळकर, सुरज मांजरेकर, विठ्ठल केळकर, संतोष वीर, विवेक केळकर, विष्णू वसकर, आदित्य आपटे, शेखर गोरे, सचिन वीर, बाबली कळंगुटकर, प्रमोद कळंगुटकर,या ग्रामस्थांनी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप होत असून सदर रस्त्याचे काम लवकर चालू न केल्यास पालकमंत्री व कलेक्टर यांना लेखी अर्ज देऊन प्रत्यक्षात जाऊन भेट घेणार आहे. असे ग्रामस्थ बैठकीत ठरवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *