
सिंधुदूर्ग:संपादकीय
दिनांक:२१ ऑक्टोंबर २०२४
हरवले आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती… सापडेना वाट ज्यांना हो तयाचा संगती या उक्तीप्रमाणे तळागाळातील शेकडो वंचित मुलांचा सांभाळ करणारा माणूस म्हणजे दयानंद कुबल. स्वतः एका गरीब कुटुंबातून शालेय शिक्षण पूर्ण करून शहरात गेल्यावर आपली परिस्थिती आणि गरिबीची वस्तुस्थिती न विसरता गरजू लोकांसाठी सुरु केलेली तळमळ आपण कित्येकदा बघितली असालच, ज्यामध्ये बांदा येथील करिअर अकॅडमी असेल, हजारो विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप, स्कॉलरशिप, सायकल वाटप, दिव्यांगांसाठी व्हीलचेयर वाटप, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास वन रुपी क्लिनिक, आरोग्य शिबिरे, मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन तर आहेच पण त्या बरोबर मुंबई पुण्यातील ५८ अनाथ मुलांचे कायमचे पालकत्व स्वीकारून त्यांची संपूर्ण जबाबदारी घेऊन आपल्या कार्यातून समाजाला प्रेरित करणारा दयावान माणूस म्हणजे दयानंद कुबल. दातृत्व आणि कर्तृत्व याची सांगड म्हणजे दयानंद कुबल, आज त्यांचा वाढदिवस असून त्यांना आमच्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा💐

