आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर

दिनांक : १२ ऑगस्ट २०२४

महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २ फेब्रुवारी २०२३ च्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करणे बंधनकारक होते असे असतानाही अद्याप सावंतवाडी तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित झालेली आढळून आलेली नाही. अशा परिस्थितीत सध्या प्रशासनाच्या विविध योजनांसाठी सामान्य नागरिकांना ग्रामपंचायत मार्फत लागणारे दाखले मिळताना अनेक अडचणी येत आहेत. ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात  वेळेत न येणे तसेच वेळेपूर्वी कार्यालयात उपस्थित नसणे. अशामुळे शासनाच्या योजनांचा लाभ घेताना दाखले मिळण्यास उशीर झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहत आहे. असे काही मागण्या घेऊन येत्या १५ ऑगस्ट ला मनसे कार्यकर्त्या सोबत आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिला होता. पण पंचायत समिती सावंतवाडी यांनी(नं.पंससा/ग्रापं -४/बा.हजेरी/१९७३/२०२४, ६/८/२०२४ रोजी पत्राद्वारे ज्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अद्याप बायोमेट्रिक मशीन उपलब्ध वा कार्यान्वयेत नाही. त्यांनी तात्काळ खरेदीसह ती कार्यान्वित करून तसेच त्यांचा अहवाल उलट टपाली या कार्यालयात सादर करणे कामी कळविण्यात आलेले आहे. असे ह्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात येत्या १५ ऑगस्ट ला घेण्यात येणारे आंदोलन आपण मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असेही म्हटले आहे. छेडण्यात येणाऱ्या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव येऊन त्यांनी  आमच्या दिलेल्या निवेदनाला मान्यता देऊन संदर्भ क्रमांक ०४ नुसार तसे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. म्हणून हे आंदोलन तात्पुरते मागे  घेण्यात येत आहे. असे मनसे तालुकाध्यक्ष श्री मिलिंद सावंत यांनी म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *