आताच शेअर करा

सिंधुदूर्ग :संपादकीय

दिनांक: ३ ऑगस्ट २०२४

बाबा सावंत एक दशावतार नाट्यकर्मी मनोगात व्यक्त करतोय पुर्ण नाव भानुदास शांबा सावंत राहणार रोणापाल इयत्ता पाचवीत असताना दशावताराची मोठी आवड शालेय शिक्षण करत असताना आपली आवड जोपासत पुढे पुढे शिक्षण घेऊ लागलो. पण मनामध्ये ध्यानामध्ये आणि बुद्धीमध्ये रात्रीचा राजा काही उतरायलाच तयार नव्हता.रात्रीचा राजा पाठीवर बोजा असला तरी त्या युगातील रात्रीचा राजा बघण्यासाठी म्हणजेच दशावतार बघण्यासाठी बरीचशी गर्दी व्हायची गावोगावी जत्रा उत्सव असले की हा दशावतार बघायला मिळायचा त्यावेळी क्वचितच नाटक व्हायचे पण ग्रामदेवतेचा जत्रा उत्सव असला की त्यावेळी मात्र नक्कीच दशावतार नाटक असायचे दशावताराची आवड असल्याकारणामुळे सातवीत असतानाच “खुनी शशांक” हे नाटक लिहिले. जसे जमेल तसे लिहिण्याचा प्रयत्न केला स्वतःच लेखक, दिग्दर्शक आणि कलावंत गोळा करून शाळेत हे नाटक सादर केले. शिक्षकांच्या पसंतीस उतरले आणि शाबासकीची थाप प्रथम गुरूकडून पाठीवर पडली.  विद्यार्थी मित्रांनाही खूप आवडले .त्यामुळे नाटकात काम करण्याची आवड अजून तीव्र झाली.१९७९ साली शिक्षण पूर्ण केले वडील आजारी शेती हा व्यवसाय वडील अंथरुणावरच खीळले असल्याकारणामुळे शेतीची पूर्ण जबाबदारी माझ्यावर  आली. ती संभाळत असताना ध्यास फक्त दशावताराचा तनात, मनात आणि ध्यानात सारखा दशावतार वावरत होता. दशावताराची आठवण झाली की आपोआपच अभिनय शरीरात भिनायचा   पण पुढे या अवस्थेचे करायचे काय ? असा प्रश्न पडला काय करावे काही सुचेना म्हणून माझा मित्र श्री. रमेश खोत राहणार कोंडुरा यांना शोधत शोधत त्यांच्या घरा पर्यंत पोहोचलो. त्यांनी माझा अभिनय पहिला आणि मला आरोलकर दशावतार कंपनीमध्ये फक्त 30 रुपये पगारावर ठेवले. मालक श्री. भालचंद्र आरोलकर आई-वडिला इतकेच त्यांनी मला प्रेम दिले. त्यांनी मला सांभाळून घेतले.अभिनय करताना भालचंद्र आरोलकर कंपनीचे मालक यांची व्यावसायिक नाटय कर्मी म्हणून पाठीवर थाप पडली आणि मी कृतकृतार्थ झालो. त्याचबरोबर पडद्या पाठीमागे आणि पडद्यासमोर श्री. सुभाष परब नावाची व्यक्ती माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिली. कारण ती नाटकामध्ये हार्मोनियम वादकाचे काम करायची अभिनय करत असताना ज्या ज्या वेळी अभिनय करत होतो. त्या त्यावेळी मनातल्या शब्द कोषातील बुद्धिमत्तेच्या जोरावर शब्द फेक करत असतानाचे चढाव आणि उताराला बरोबर हार्मोनियम ची साथ देऊन त्यांनी अभिनयाचा गोडवा वाढवण्याचा प्रयत्न केला.  त्यामुळे लोकांच्या अभिनय पसंतीस आला. आणि माझ्या जीवनाला गती मिळाली. दोन वर्ष आरोलकर कंपनीत राहिलो. तिसऱ्या वर्षी कलेश्वर दशावतार या कंपनीत गेलो तिथेही काही वर्ष त्या कंपनीमध्ये दशावतार सोंग (नटण्याच)बांधण्याचं  काम केलं. आता दशावताराच्या आयुष्याची खरी सुरुवात झाली ती म्हणजे श्री. यशवंत तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाने चेंदवणकर कंपनीमध्ये काम करत असताना महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण या संस्थेत दशावतार नाट्य सादर करण्याची संधी मिळाली. त्या महोत्सवामध्ये माझ्या अभिनयाला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. त्यानंतर सतत पारितोषिकांची बरसात सुरुवात झाली. नाईक मोचेमाडकर कंपनीमध्ये नारद या भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक मिळाले. खानोलकर दशावतार कंपनीमध्ये महाविष्णू या भूमिकेसाठी द्वितीय पारितोषिक मिळाले आजगावकर दशावतार कंपनीमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दंडक लवणासुर, भारद्वाज ऋषी या दोन्ही भूमिकांना असंख्य पारितोषिक मिळाली. ह्या दोन्ही भूमिका तशाच त्याच तोला मोलाच्या होत्या. लोकांमध्ये ह्या भूमिकांनी प्रचंड आवड निर्माण केली होती. त्यामुळे प्रसिद्धी खूप मिळाली. आणि बाबा सावंत हे नाव दशावतारामध्ये नावारुपाला आले खरी कृपा तर माझ्या आई-वडिलांची आणि ग्रामस्थीत बसलेली गावचे आराध्य दैवत श्री देवी माऊली. रोणापाल हिची कारण हे दोन्ही दैवत जर माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले नसते तर  दशावतार हा माझ्या हृदयात राहिला असता. तो मी माझ्या कलाकृतीने असंख्य रसिक मायबापांच्या हृदयात उतरू शकलो नसतो. ग्रामदेवते बरोबरच गावातील सर्व लोकांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच हे शक्य झाले. श्रीमान कैलासवासी चंद्रकांत भोजू गावडे यांनी  तर माझ्या कलाकृतीला खूप मोठे प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर खांद्याला खांदा लावून चालणारे माझे मित्र श्रीमान सुरेश जी गावडे यांचे सहकार्य मला वेळोवेळी लाभले. घाबरू नकोस मी तुझ्या  पाठीशी आहे. असं हिरहिरीने सांगणारे सुरेशजी गावडे आणि उदय देऊळकर त्याचबरोबर माझा गाव आणि माझ्या गावातील माणसं माझ्या पाठीमागे सदैव उभी राहिली. आज मला खूप आनंद होतो आहे. याच्या मुळाशी कारण एकच गाव केर यांनी दिलेला पुरस्कार माननीय  अध्यक्ष श्री. प्रेमानंदजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मिळालेला हा पुरस्कार. हा पुरस्कार स्वीकारत असताना माझा गाव माझ्या गावातील माणसं माझी पत्नी सौभाग्यवती अन्नपूर्णा, माझा मुलगा संभाजी उर्फ जयदीप सावंत मित्रमंडळी आणि रसिक मायबाप प्रेक्षक यांची खुप आठवण आली मन गहीवरून आलं दशावतार रंगभूमीची अविरत सेवा करत असताना आयुष्याची साठ वर्ष केव्हा निघून गेली काही कळालच नाही. आजही रंगभूमीवर उभे राहत असताना तरुणाईत असताना ज्याप्रमाणे रंगभूमी गाजवली त्याचप्रमाणे त्याच  थाठा-माठात आणि डौलात आजही त्या रंगभूमीवर नाटक सादर करतोय. दशावतार रसिक मायबाप प्रेक्षकांमुळेच त्याच जोमाने आज रंगमंचावर उभा राहून अभिनय सादर करत आहे. रसिक मायबाप प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आयुष्यात कधी विसरणार नाही. कलाकाराचे जीवन रसिक मायबाप प्रेक्षकामुळेच सलाखून निघत असते. त्या मुळेच जीवन सुगंधमय होत गेले आणि प्राजक्ताचा सडा अंगणी रसिक मायबापांच्या हृदयात अविरतपणे जागृत राहिला. शेवटी रसिक मायबापांना विनम्र अभिवादन करून आपण दिलेल्या माझ्या आयुष्यातील दशावताराच्या या कलेला मान सन्मान स्वीकारून रसिक माय बापांच्या चरणी लीन होऊन कोटी कोटी प्रणाम करतो आणि माझ्या लेखणीस पूर्णविराम देतो.

प्रेक्षक मनोगत एक आठवण
बाबा सावंत दशावतार नाट्यकर्मी आमच्या लहान पणा पासूनच दशावतारातील त्यांचा अभिनय पाहत आलेलो आहोत. त्यांचे बरेचसे अभिनय आमच्या हृदयात आजही तेवढेच ताजेतवाने आहेत .लहानपणी जत्रा उत्सव आला की दशावतार नाटके  व्हायची त्या दशावतार नाटकांमध्ये बाबा सावंत हे व्यक्तिमत्व कुठच्या कंपनीमध्ये काम करत आहे हे पाहायचो आणि  आवर्जून सांगू इच्छितो की बाबा सावंत हे ग्राम – मडूरा येथील दशावतारामध्ये आजगावकर किंवा नाईक कंपनीमध्ये असायचे.  जत्रा उत्सव आला की प्रथम एक महिन्यापूर्वीच आम्ही बाबा सावंत या नाट्य कर्मी ची वाट पाहायचो माझ्या आयुष्यात मी दोन ते तीन वेळा आजगावकर कंपनीमध्ये त्यांना काम करताना पाहिले. रात्री दोन वाजता दशावताराचा प्रथम राजा यायचा आणि नाटकाचा मध्यांनतराला  बाबांचा प्रवेश व्हायचा  मुळातच नाटकला खूप उशिराने सुरुवात होत असल्या कारणामुळे आणि जत्रा हिंडून हातपाय गळतीला येत होते. त्यामूळे मंदिरात नाटक चालू असतानाच झोप यायची पण बाबांचा प्रवेश आला की  आईच्या एका हाकेने उठायचो कारण तोच बहारदार पेहराव तीच राजेशाही  बोलण्याची भाषा शैली तीच एकटक बघणारी नजर आणि त्यातून बाहेर पडणारे परखड शब्द लोकांच्या हृदयावर राज्य करत होते.बाबांचा एक दुःखी प्रसंग अजूनही आठवतो. आजही माझ्या हृदयात सामावलेला आहे. कारण ज्यावेळी बाबा अभिनय करत होते. त्यावेळी त्यांच्या पाठीवर बसणारे ते चाबकाचे फटके आणि त्या अभिनयातून असंख्य वेदना त्रास होणारा नाट्यमय चित्र उभा  करणारा अभिनय आणि शरीर पिळवटून काढणारा तो प्रसंग अक्षरशा लोकांच्या डोळ्यात  अश्रूच्या धारा अविरत बाहेर पडत होते. कारण बाबांचा अभिनयच त्या तोलामोलाचा होता. त्यादिवशी त्या नाटकामध्ये बाबांची धर्मपत्नी ही नाटक पाहत होती. लोकांच्या डोळ्यात अश्रूंचे पाठ वाहत होते आणि त्यांची पत्नी तो अभिनय पाहत असताना बाबांच्या धर्मपत्नीला  पाहता पाहताच चक्कर आली. खरोखरच आपल्या पतीवर समोरची व्यक्ती असा आघात करते का ? ह्याच जाणिवेने तिच्या हृदयात सखोल जखम निर्माण झाली डोळ्यासमोर अंधार आला. आणि ती धरती समान झाली. एवढ्या तोला मोलाचा अभिनय करणारे बाबा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. असे कित्येक अभिनय आम्ही त्यांचे जवळून पाहिले आहेत. सध्या स्थित ” सडा अंगणी नियतीचा” हे नाटक करत आहेत.नाईक दशावतार झरे बांबर या कंपनीने मालक श्री. आबा नाईक व सागर नाईक यांनी कसून मेहनत घेवून प्रस्तुत केलेले हे  नाटक गेली दोन वर्षे  अविरत पणे चालु आहे. हया नाटकातील वृद्ध लंगडा ही भूमिका बाबांनी साकारलेली आहे. ही भूमिका लोकांच्या पसंतीस खुप उतरली असुन बाबावर अभिनंदनाचा वर्षाव आणि शाबासकीचा थाप पडत आहे.या नाटकात बाबांची लंगडा वृद्ध हे भूमिका पाहत असताना नाटय रसिक स्वतःचे आत्मपरीक्षण करत आहेत.  ती पाहत असताना साक्षात नटसम्राट श्रीराम लागू यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभे राहते. तेवढ्याच तोला मुलाने आणि हृदयाच्या गाभाऱ्यातून ही भूमिका रसिक प्रेक्षकांच्या समोर बाबा सादर करत आहेत. बाबांची ह्या भूमिकेत तीच शब्द फेक, तोच आवाज, तीच कापरी मान हलवणं, तिचं  नजर आणि कित्येक मिनिट लंगड्या पायावर काठीच्या सहाय्याने उभे राहून तेवढ्याच तोलमोलाने अभिनय सादर  करणे हे क्वचित एकादा कलाकार अशी भूमिका साकारू शकातो. बाबाना पाहून साक्षात अभिनय प्रेक्षकांच्या हृदयात कसा भरावा आणि त्यांच्या मनामध्ये अभिनयाचे चित्र कसे उभे करावे हे दिसून येते.  बाबांची बोलण्याची भाषा शैली आणि बोलण्याची ठेक वेगळी असल्या कारणामुळे दशावताराच्या रंगमंचावर अभिनयाच्या रणांगणात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आज बाबांना दशावतार नाटय रंगभूमीवरची अभिनयाची पोच पावती म्हणुन “फरा प्रतिष्ठानचा” स्नेहाविष्णू नाट्यकर्मी फरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अशा या दशावतार नाट्यकर्मीला माझा सलाम.

                                  लेखन

                         संपादक: यश माधव

                  “चारोळी”

रंगप्रभूच्या पुण्यपदांस्त्वव पदोपदी आषदा साहील्या!!

आकांक्षा अश्याही साऱ्या सेवाभावे त्यास वहिल्या!!

नाटयकर्मी नटवर्य नारोत्तम बहुत भूषणें दैवे दिधली!!

रसिक जनार्दन मनीतोषला चीरतृप्ती जन्मास लाभली!!

                              लेखन

                    श्री.कृष्णा देवळी (ओटवणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *