आताच शेअर करा

सिंधुदुर्ग संपादकीय

दिनांक: १० जानेवारी २०२५

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगावं गावचे सुपुत्र तसेच सध्या वास्तव्यास आडेली मध्ये असलेले डॉ. अनंत (अण्णा )दिगंबर प्रभू आजगावकर यांची ‘वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड’ (worldwide Book Of Record )  मध्ये विक्रमी नोंद झाली आहे.
  
अजून एका नावीन्यपूर्ण विक्रमाची नोंद’ वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड’ (worldwide Book Of Record ) ने डॉक्टर अनंत प्रभू आजगावकर यांना मेडल आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
  लाल भेंडीचे झाड त्यांनी १८ फूट ५ इंच उंच करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. हे झाड किमान दोन वर्षे जीवंत राहू शकते. त्याला सहा इंचाचे ३००ते ४०० भेंड्या वर्षभरात येतात. हया भेंडीची भाजी  खाल्ल्यावर जीवनावश्यक पोषक द्रव्य भरपूर प्रमाणात भेटतात. आशा पद्धतीचे संशोधन करून ही भेंडीची जात विकसित करण्यात आलेली आहे. मधुमेहावर गुणकारी औषधी म्हणून याची भाजी खाल्ल्यास काही काळातच मधुमेह नियंत्रित येतो. ह्या भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असून जेवणाच्या ताटातील महत्त्वाचा आहार म्हणून या भाजीला संबोधता येईल.
हे भेंडीचे झाड त्याच्या बी पासून न बनवता त्या झाडाच्या खोडाच्या डोळ्यापासून  झाड विकसित करण्यात आलेले आहे.

त्यामुळे भविष्यात बिया जरी रुजत घातल्या आणि हे झाड वाढवण्याचा प्रयत्न केला तरी हे झाड विकसित करता येणार नाही. त्यासाठी वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून या झाडाला विकसित करण्यात आलेले आहे.
कोकण व्हिजन न्यूज चैनल च्या माध्यमातून डॉक्टर अनंत प्रभू आजगावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली आहे. पुढे ते म्हणाले की मी अजूनही कोकणातील बऱ्याचशा फळ आणि भाज्यांवर संशोधन करत आहे. त्यातील आंबा आणि काजू हे कोकणातील महत्त्वाचे पीक असल्यामुळे त्याच्यावर सध्या जोरदार संशोधन चालू आहे. पायरी जातीचा आंबा हा बरका असल्याकारणाने त्याला मार्केटमध्ये योग्य तो भाव मिळत नाही.  त्यावर प्रक्रिया करून तो आंबा घट्ट आणि मार्केटमध्ये कसा विकता येईल यावर संशोधन चालू आहे. तसेच मधुमेही रुग्ण एक किंवा दोन तुकडेच आंब्याचे खाऊ समाधानी होतात त्यांच्या साठी मधुमेह विरहित आंबा कसा तयार करु शकतो  त्याच्यावर जोरात संशोधन चालू केले असून तो मधुमेह रुग्णांसाठी भरपूर प्रमाणात कसा खाता येईल यावरही माझे संशोधन चालू आहे. असे म्हणाले.
सद्या कोकणातील काजूला मार्केटमध्ये भरपूर मागणी आहे त्या  काजूची  साईज मोठी कशी बनवता येईल  आणि काजूमुळे मनुष्याला त्यातून जास्त पोषक द्रव्य मिळतील यावरही माझे संशोधन चालू आहे. फळझाडे आणि भाज्या यांच्या प्रजाती माझ्याजवळ तयार आहेत.पण संशोधन करण्यासाठी चार ते पाच वर्षाचा कालावधी  जातो त्यामूळे वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर प्रयोग करावे लागतात. प्रयोग शाळेमध्ये लॅब टेस्टिंग केली जाते आणि सर्व चाचण्या परिपूर्ण झाल्यानंतर त्यांचे  संशोधन पूर्ण करून ही जात विकसित करण्यात येते. त्यामुळे एखादी जात विकसित करायला त्याला बराच वेळ लागतो. तसेच हे काम करताना बराचसा निधि खर्चही होतो. पैश्या शिवाय तंत्रज्ञान विकसित करता येत नाही. शासनाने या कामासाठी आर्थिक सहकार्य केल्यास मी बऱ्याच प्रमाणात नव नवीन फुले, फळे भाज्या यावर संशोधन  करण्याचा माझा मानस आहे.कोकणातील नवीन प्रजातींना उजाळा देण्याचा प्रयत्न करू शकतो. या जाती तयार करण्यासाठी भरपूर पैसा खर्च करावा लागतो. शासन   मला अर्थ सहाय्य न करता मी माझ्या कुटुंबाचा संभाळ करत असताना  राहिलेल्या आर्थिक पैशातून देशासाठी या नवीन जाती विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. या कामासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री  रवींद्र चव्हाण साहेब यांचे वैयक्तिक सहकार्य लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *